समांतर जल वाहीनेचे काम गेल्या अनेक वर्षा पासून ऐकतो आहे की शहराला पाणी पुरवठा हा समांतर जल वाहिनीने होणार आहे परंतु महापालिकेच्या उदासीन प्रशासना मुळे तसेच लोकप्रतिनिधींचे त्यातील राजकारण ह्या मुळे ही योजना लांबत चालली आहे जर आज हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे दिले तर हे काम निश्चितच पूर्ण होईल परंतु त्या साठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष करून समांतर जल वाहिनीचे काम पूर्ण करून घ्यावे नाही तर असे होईल सरकारी काम सहा महिने थांब ह्या म्हणी प्रमाणे होऊ नये आज शहराच्या सातारा परिसरात खुप मोठी वसाहत झाली परंतु त्या भागात एक थेंब पाणी नाही प्रत्येक निवडणुकीत समांतर जलवाहिनेचे काम पूर्ण होणार असे गाजर दाखवले जाते परंतु प्रत्यक्षात काहीच नाही त्या मुळे हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडेच द्यावे तत्काळ आज ह्या योजनेची कॉस्ट वाढत चालली आहे महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट औरंगाबाद
सरकारी काम सहा महिने थांब असे होऊ नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2019, 5:44 am