हे छायाचित्र आहे नेहमीच अतीप्रमाणात गजबजलेल्या समर्थनगरमधील चौकाचे.रेल्वे स्टेशनपासून ,समर्थनगर कडून व एस.टी.स्टँडकडून दिवसंरात्र वाहने या चौकातून येत जात असतात.एव्हढा महत्वाचा केंद्रबिंदू असूनही येथील हायमास्ट मात्र असा बंद पडलेला दिसत आहे.गल्लीबोळातील दिव्यांबाबत उदासिनता एक वेळ समजू शकतो मात्र अशा मुख्य चौकांबाबत तरी प्राधान्याने दिवे सुरू असावे असे संबंधितांना वाटत नाही काय ? जनता,वाहनचालक यांचा विचार करून त्वरीत दखल घेतली जाईल काय ? शरद लासूरकर औरंगाबाद-
वरद गणेश मंदिर चौकातील हायमास्ट बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2019, 5:42 am