जळगाव रोड जवळील एस बी ओ ए शाळा चौकात सिग्नल यंत्रणा बसवून दोन महिन्याचा कालावधी होत आहे, शाळा भरायच्या व सुटायच्या वेळेस या चौकात एकच गर्दी होते. ऑटोरिक्षा चालक मन मानेल तेथे ऑटो थांबवितात त्यामुळे रस्त्यावरच प्रवाशांशी चढउतार सुरू होते. काही महाभाग चिल्लरच्या क्षुल्लक कारणावरून रस्त्यावरच विनाकारण वाद घालीत बसतात. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. पळा पळा कोण पुढे पडतो, अशी जणू स्पर्धा लागलेली असते, पोलिसही हजर नसतात, पालकांना तर रस्ता ओलांडावा कसा?असा प्रश्न पडतोरवींद्र तायडे
रस्ता ओलांडावा तरी कसा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2018, 5:35 am