आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे-वरवंटे या वस्तूंची जागा अनुक्रमे गॅस, पीठ गिरणी व मिक्सरने घेतल्याने या दगडी वस्तू आता अडगळीच्या ठिकाणी दिसत आहेत. गिरणी व मिक्सर येण्यापूर्वी महिलावर्ग सर्रास स्वयंपाक घरात मसाला वाटण्यासाठी पाटा-वरवंटा वापरत.तर डाळी व हळद बनविण्यासाठी जात्याचा वापर करीत असत. परंतु नवीन ब्रँडेड कंपनीचे मिक्सर बाजारात आल्याने आता मिक्सरस महिला वर्गाच्या गळ्यातील ताईत बनला आहे.उन्हाळ्यात महिला ओव्या म्हणत जात्यावर तयार डाळी करीत असत.परंतु आता तेही काम गिरणीत होत असल्याने जाते पाटा आणि वरवंटा कालबाह्य ठरू लागले आहे .श्री रवींद्र तायडे
जाते, पाटा-वरवंटा अडगळीच्या जागी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2019, 5:40 am