शहरातील भगतसिंग नगर भागात अनेक टोलेजंग इमारती आणि सदनिका स्थापन झालेल्या आहेत चाळीस हजारांहून जास्त लोकवस्ती या भागात आहे परंतु भगतसिंग नगरातील मुख्य रस्ता असा नादुरुस्त झालेला आहे .पावसाच्या पाण्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचते व त्यातून वाहन गेले की पादचाऱ्यांना धुलिवंदनाचा अनुभव सातत्याने येत असतो तसेच चिखल माती आणि धुळीचा ही त्रास सहन करावा लागत आहे या भागातील नागरी समस्या सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी एकमुखी मागणी भगतसिंग नगर वासियांची आहे तसेच हर्सूल टी पॉइंट ऑडिटर सोसायटी हा रस्ताही अतिशय कासव गतीने सुरू असल्याने रहिवाशांना हर्सूल टी पॉइंट येथे जाण्यासाठी एस बी ओ ए शाळेकडून यु टर्न घेऊन लांबून जावे लागते त्यामुळे हर्सूल टी पॉइंट ते ऑडिटर्स पर्यंतचा रस्ता तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे रश्मी नगर ते शिवेश्वर कॉलनी हा रस्ता अतिशय खराब आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याकडे संबंधितांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे रवींद्र तायडे
भगतसिंग नगर रोडवर खड्डेच खड्डे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2019, 5:43 am