हर्सूल ते पिसादेवी रोडवर असणाऱ्या नव्याने वसलेल्या छत्रपती नगरात पिण्याचे पाणी, पक्के रस्ते, पथदिवे यांचा अभाव जाणवतो. या भागात काळी जमीन असल्याने ड्रेनेज लाईनचे चेंबर्स खचलेल्या अवस्थेत आहेत. लिकेजमुळे दुर्गंधी वाढत असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. टँकरच्या पाण्यावरच घरातील गृहिणींची पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. रस्त्याची तर अशी वाट लागली आहे की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळायला मार्ग नाही. या नगरातील सर्व नागरी समस्या सोडवून हर्सूल ते पिसादेवी हा तीन किलोमीटर्सचा रस्ता डांबरीकरण करून गुळगुळीत करावा, अशी मागणी साहेबराव पाटील, अनिल अवचार, निखिल अवचार, गोरखनाथ वाघमारे, राहुल वाघमारे, जगन्नाथ रोठे, संतोष रोठे, संतोष वाघ, रामकृष्ण वाघ आदींनी केली आहे.रवींद्र तायडे
छत्रपती नगरात मूलभूत सुविधांचा अभाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2018, 11:49 am