काही निंर्बध शिथिल करुन ३१ आँगष्ट पर्यंत लाँकडावुनचा घेतलेला निर्णय यौग्य वाटतो. परंतु काही अर्थ तद्न्यांच्या मते वारंवार लाँकडावुन लावने हा काही करोना ला पर्याय नाही. राज्याचे अर्थ चक्रही फीरले पाहीजे त्याच बरोबर करोनाचा ससंर्ग ही थोपला पाहीजे हे बरोबरच . हाच धागा धरुन सरकारने ३१ आँगष्ट पर्यंत काहीं नियम शिथिल करुन लाँकडावुन वाढवीला म्हणूनच निर्णय यौग्य वाटतो. नियम जरी शिथिल केले असले तरी जनतेने त्याचा गैर फायदा न घेता सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे ततोंतत पालन करणे गरजेचे आहे. नियम शिथिल केल्यामुळे हातावर पोट असलेल्याना काम मिळेल व त्यांच्या ऊपजीवेकेचा प्रश्न मिटेल. औधौगीक क्षेत्रातील कपंन्या चालु होवुन सबंधित कंपन्यात काम करनार्या कामगाराना काम मिळेल . औधौगीक क्षेत्रातील कार्यक्षमता वाढुन त्यातुन सरकारला महसुल मिळेल . ह्या करोना मुळे सर्वच क्षेत्र डबघाईला आलेले असुन थोड्या प्रमाणात आर्थिक चक्र फिरण्यास मदत होईल . परंतु सरकारने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन सर्वाना करावे लागेल . म्हणून असे वाटते की. घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.सुभाष डाखोरे ९४२३४५११३७
लाँकडावुनचा निर्णय यौग्य वाटतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2020, 5:30 am