औरंगाबाद शहराची वेस समजल्या जाणाऱ्या हर्सूल गावातील रस्ता अतिशय अरुंद असल्याने खान्देश, विदर्भ तसेच सिल्लोड-सोयगाव कडे जाणाऱ्या बस चालकांना व इतर खाजगी वाहनधारकांना हर्सूल गावातील बेशिस्त वाहतुकीचा मोठा सामना करावा लागत आहे. रोडवरच बेशिस्तपणे रिक्षा उभ्या असतात आणि किरकोळ विक्रेत्यांचे रस्त्यावरील अतिक्रमणे वाढलेली आहे त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी होते. अनेक पर्यटक जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेण्या बघण्यासाठी या रोडणे ये जा करीत असतात. परंतु वाहतूक कोंडी नित्याचीच असल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होतो. कधी कधी तर वाहतूक कोंडीमुळे हर्सूल गाव ते हर्सूल टी पॉइंट पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. शहर वाहतूक विभागाचेही याकडे प्रकर्षाने दुर्लक्ष दिसून येते. हर्सूल गावातील रस्त्याचे चिकलठान्याच्या धर्तीवर तातडीने चौपदरीकरण करून दुभाजक तयार करावेत अशी असंख्य वाहनधारकांची एक मुखी मागणी आहे. श्री रवींद्र तायडे
शहराच्या वेशीजवळ मोठी वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2020, 5:45 am