हो अपघातातील जखमींना मदत करण्याचे सोडून मोबाईल चित्रीकरण करणारांचे प्रबोधन करण्याची गरज आहे हे खरे आहे.पोलीसकार्यवाहीस जनता घाबरते.ती साक्ष,कोर्ट कचेरी,हेलपाटे यास सामान्य माणूस घाबरतो.आतातर पोलीसप्रशासनाकडून अभय मिळाले आहे.यापुढे चित्रीकरण न करता त्वरीत साहाय्य करून एखाद्याचे प्राण वाचवू शकू.सामाजिक संघटनांचे सहकार्यांने सुद्धा जनतेचे प्रबोधन त्वरीत करणे आवश्यक आहे.तरच पुढील अनर्थ टाळणेसाठी मदत होईल.....शरद लासूरकर औरंगाबाद.
अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी मोबाईल चित्रीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2019, 5:40 am