शहरातील हर्सूल ते पिसादेवी रोड वर छत्रपती नगर, भगतसिंगनगर, अशोकनगर, हरसिद्धिनगर यासह अनेक नवनवीन मोठ्या वसाहती स्थापन झालेल्या आहेत .परंतु या भागात नागरी समस्यांची प्रकर्षाने वानवा जाणवते .सारा रिद्धी रो हाऊसेस आणि सदनिका ही अशीच जुनी नागरी वसाहत येथे आहे. परंतु या वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरच चिखलाचा असा खच असतो. चारचाकी वाहनेही या रस्त्याने येऊ-जाऊ शकत नाही. रस्ते ,पिण्याचे पाणी यासाठी येथील रहिवाशांना नेहमीच आंदोलने करावी लागतात परंतु पदरी काहीही पडत नसल्याची रहिवाशांची खंत आहे .या भागामधील नागरी समस्या सोडविण्यासाठी खुद्द लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. रवींद्र तायडे हर्सूल
सारारिद्दी वासहतीसमोर चिखलच चिखल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Sep 2018, 5:32 am