दिनांक 23 एप्रिल ते 5मे सडक सुरक्षा जीवन रक्षा पंधरवडा म्हणून वाहतूक विभागातर्फे पाळण्यात येत आहे. वास्तविक पाहता वाहतुकीचे नियम तसे कठोर आहेत मात्र चालक नियमांचे पालन न करता आपली वाहने सुसाट पळत व दोषी आढळल्यास प्रसंगी दंड भरून मोकळे होतात वाहतूक नियमांचे पालन हे स्वतःपासून करायला पाहिजे अल्पवयीन मुलांच्या हाती बाईक न देण्याची जबाबदारी पालकांची आहे तरुणांनी आपली ऊर्जा अपघातग्रस्त जखमींचे मोबाईल शूटिंगमध्ये अथवा रेसिंगमध्ये वा ओव्हरटेक करण्यामध्ये खर्च न करता अपघातग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी नव्हे प्रथमोपचार करण्यासाठी उपयोगात आणावी सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी सुरक्षा वाहतुकीचे चर्चासत्र ,रस्ता सुरक्षा विषयाची चिन्हांकित माहिती शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक विषयावर चित्रकला स्पर्धा तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे अत्यावश्यक आहे रस्ता वाहतूक सुरक्षेबाबत मुलांच्या माध्यमातून त्यांच्या मित्रापर्यंत व घरापर्यंत जनजागृती साधली जाणे आवश्यक आहे असे मत व्यक्त होत आहे रवींद्र तायडे
वाहतूक शिस्तीसाठी जनजागृती करणे आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2018, 5:33 am