कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने,सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला असतांना,कोरोना संक्रमणाची दुसरी लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने,पुनः चिंता वाढली आहे। एका गटाकडून दुसरा गट जेंव्हा संक्रमित होतोतेंव्हा,रुग्ण वाढीचा वेग दुपटीने वाढतो।बहुसंख्य युरोपियन देशात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे।इंग्लंड, इटली,जर्मनी, स्पेन, फ्रान्स,आदी देशात दुसऱ्या लाटेचा तडाखा बसत आहे।अशावेळी भारताने ही सतर्क होण्याची गरज आहे।रुग्णालये सुसज्ज ठेवावी लागतील।क्वारंटाईन सेंटर उभे करणे, कोव्हीड केअर सेंटर उभारून त्यात अद्ययावत सुविधा पुरविणे।ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे।व्हेंटिलेटर कमी पडू नयेत।अर्थव्यस्थेने बाळसे धरायला नुकतीच सुरुवात केली असतांना, पुनः निर्बन्ध लादल्यास जनता कितपत त्यास राजी होईल,प्रश्नच आहे।तेंव्हा जनतेला विश्वासात घेऊन कांही अंशी कठोर निर्णय आवश्यक वाटतात।जसे धार्मिक स्थळे बंद ठेवणे आदी..। आयसीयू सहित सुसज्ज रुग्णालय व बेड्सची संख्या वाढवावी।डॉक्टर तसेच परिचारिका,वार्डबॉय, आदी कोरोना योद्धयांची संख्या वाढवून ठराविक शिफ्टचे नियोजन करावे।सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग, या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्षित करून चालणार नाही।चहुकडे बेफिकिरीचे वातावरण निर्माण होत असल्याने तो अधिक धोकेदायक आहे।'तर्क नको,सतर्क व्हा'--एवढेच..!डॉ.नूतनकुमार सी.पाटणी,औरंगाबाद
सतर्कता हवीच..!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2020, 5:32 am