ग्रीन सिटी क्लीन सिटी अंतर्गत शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने विविध वृक्ष लावणे गरजेचे आहे.शहरातील महत्त्वाच्या दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावल्यास शहर खऱ्या अर्थाने पर्यटननगरी म्हणून शोभेल. रुंदीकरणाच्या नावाखाली तर पैठण रोड वर अनेक जुन्या वृक्षांचा नाहक बळी गेलेला आहे.शहरांमधील जळगाव रोड भागातील एका नागरी वस्तीमध्ये प्रतिबंध असतानाही वृक्षांची अशी खुलेआम कत्तल बघायला मिळाली. पर्यावरण प्रेमी आणि संबंधित विभागाने अशी सहजपणे वृक्षांची कत्तल होणार नाही याबाबत नागरिकांमध्ये खऱ्या अर्थाने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.श्री रवींद्र तायडे
झाडांची खुलेआम कत्तल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2018, 5:36 am