औरंगाबाद- शहरांमध्ये अनेक समस्या अनेक दिवसांनंतरही ठाण मांडून बसल्या आहेत.त्यापैकी एक खड्डेयुक्त रस्त्यांची मालीका....आता गणेशजींचे आगमन होणार सर्व रस्त्यांवर भाविकांचा पूर ओसांडणार हे गृहीत धरून मनपा या समस्येसाठी कंबर कसणार अशी जनतेची भाबडी समजूत.मात्र ठेकेदार त्यांच्या मागण्या त्यांच्या समस्या नेहमीप्रमाणे डोके वर काढणार आणि म..ग ? ही समस्या आपल्याच मनपात का उद्भवते ? मोठमोठया शहरांतून सार्वजनिक कामे वेळेत होतात मग घोडे अडते कोठे ? वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसणारे कर्मचारी ! ना त्यांच्याकडून कामे करून घेता येत ना बदली करता येत.प्रशासकिय यंत्रणा ,निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा याबाबतीत उदासिनता दिसून येते.सणासुदीच्या दिवसात तरी सामाजिक भान ठेवून त्वरीत रस्तादुरूस्ती कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावेत ही सामान्य जनतेची अपेक्षा ! जेणेकरून अपघात कमी होऊन रसिकवृंद ,भाविक सणाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील....शरद लासूरकर सिडको औरंगाबाद-
गणेशोत्सवापूर्वी खड्डे दुरूस्ती ....ठेकेदार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2019, 5:42 am