शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा मुद्दा ज्वलंत विषय बनला आहे.मुलांना शाळेत तसेच शाळेतून घरी सुरक्षितपणे नेताना रिक्षा तसेच स्कूलबस चालकांची मोठी कसरत होते. हे टाळण्यासाठी शिस्त लावणे गरजेचे आहेे.यासाठी वाहतुकी संदर्भात मार्गदर्शन करणे गरजेचे आहेे. एका रिक्षातून जेवढे विद्यार्थी व्यवस्थित बसतील तेवढेच न्यावेत अशी शिस्त लावावी. वाहतूक शाखेने पुढाकार घ्यावा तसेच पालकांनी देखील रिक्षा तसेच बसमध्ये अधिक मुलें कोंबणार नाहीत याबाबत जागरूक रहावे.शक्यतो स्कुल बस हाच सुरक्षित पर्याय आहे. परंतु जेथे बस सेवा उपलब्ध नाही तेथे रिक्षाला सुरक्षिततेसाठी शिस्त लावणे गरजेचे आहे.पालकांनी आपल्या पाल्याचा जीव धोक्यात न घालता स्वतः लक्ष घालणे गरजेचे आहे.प्रेषक : महेश उमरदंड,औरंगाबाद
सुरक्षित शालेय वाहतुक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 5:42 am