सध्या करोना रोगाचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे, म्हणून विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना UGCच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेड प्रदान करण्याच्या पर्यायाला मान्यता द्यावी.विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा मग परीक्षाअशी भूमिका काही अधिसभा सदस्यांनी घेतली आहे.मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.परंतु,ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची आहे,त्यांना परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा होणार,असे पत्र राज्य शासनाला पाठविले.त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या दोन मत प्रवाह निर्माण झाले आहेत.परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असून सध्या आपल्या गावी गेले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शहरात बोलवल्यास त्यांचा राहण्याचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखेआहे. त्यामुळे विद्यापीठाने अंतिम वषार्ची परीक्षा घेऊ नये.
आधी विद्यार्थी सुरक्षा, मगच परीक्षा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2020, 5:30 am