जटवाडा रोडवर शेकडो अनाधिकृत विट भट्या दिवस रात्र धूर ओकत असून जटवाडा रोड परीसरातील १५000 पेक्षा जास्त लोकांना दररोज विटभट्यांच्या प्रदूषणाचा , व त्यापासून निर्माण होणाऱ्या आजाराचा सामना करावा लागत आहे. प्रदूषण महामंडळ औरंगाबाद येथे अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. सदरील समस्ये बाबत पुरातत्व खाते देखील उदासीन आहे. तलाव परीसरातील विटभट्या मकबरा व लेनी पासून फक्त एक ते सव्वा कीलोमीटर आहे. दख्खन चा ताज बीबी का मकबरा काळवंडण्यात ह्याच भट्यांचा मोठा हात आहे. लेण्यांची चमक ह्या भट्यांमूळे कमी होत आहे. सदरील पुरातत्व ठेवा धोक्यात आणणाऱ्या या भट्यांवर कायमस्वरुपी जरब बसेल अशी कार्यवाही होणे अपेक्षित आहे.याची दखल झोपलेले प्रशासन घेईल काय?
विटभट्यांच्या गराड्यात स्वास गुदमरला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2018, 5:38 am