देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे सध्या देशात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे आज लॉक डाऊन मुळे नागरिक घरातच बसून आहे अनेक वेळा आत्यावशक सामाना करिता नागरिकांना बाहेर पडावेच लागते अशा वेळेस त्या भागातील नगरसेवकांनी कार्यकर्त्यांना हाताशी धरून आपापल्या वार्डातील नागरिकांची काळजी घ्याला हवी वार्डातील नगरसेवकाने प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या काय गरजा आहे तसेच त्याच्या घरतील प्रत्येकाची आरोग्याची चौकशी करून कोणी आजारी आहे का याची चौकशी करायला हवी एखाद्या कुटुंबात कोणी आजारी असेल तर त्याची नोंद घेऊन आरोग्य विभागाला कळवून व त्या रुग्णाची सर्व सोय करावी शिवाय प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या वार्डात सॅनिटायझेर ची फवारणी करून कोरोना चा प्राधुरभाव कमी कसा करता येईल आणि नागरिकांना ह्या कोरोनाची लागण होणार नाही अशी कांमे नगरसेवकाने केली तर लोकांना व शासनाला नक्कीच मदत होऊ शकेल शेवटी नगरसेवक हा नागरिक आणि शासन ह्यांच्या मधील दुवा आहे ह्या लॉक डाऊन मुळे संपूर्ण देशाचे अर्थचक्र थांबले आहे शासनाने आता ग्रीन झोन मधील सर्व व्यवहार चालू करण्यास काहीच हरकत नाही विवेक श्रीकृष्ण चोबे झाम्बड इस्टेट
नगरसेवकाने नागरिकांची काळजी घ्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2020, 5:30 am