मुख्य जलवाहिनीतून पाण्याची चोरी का होत आहे? याचा आधी महानगरपालिकेने प्राधान्याने अभ्यास करायला हवा.मुख्य जलवाहिनी जायकवाडीतून आलेली असल्यामुळे तिचा प्रवाह प्रचंड आहे त्यामुळे या वाहिनीतून पाण्याची फार मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.त्याचे कारण म्हणजे कर अदा करूनही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी म्हणजे एक मृगजळ झालेले आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणीच मिळत असेल तर मग रहिवाशी जगण्यासाठी करणार तरी काय? महानगरपालिका जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक करीत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. समांतर जलवाहिनीचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागणार नाही आणि सर्व औरंगाबादकरांना जोपर्यंत हक्काचे पिण्याचे मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत पाण्याच्या लपून छपून अशाप्रकारच्या चोऱ्या होणारच आहेत असे परखड मत नागरिक व्यक्त करताना दिसतात.श्री रवींद्र तायडे
मनपाची डोळेझाक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:13 pm