शहागंज भागातील निजामुद्दीन चौकातील महाराष्ट्र हिंदी विद्यालय समोर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व लिक झाल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे.शाळेसमोरील मुख्य प्रवेशद्वारातून विद्यार्थ्यांची कायम ये-जा असते शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारासमोरुन जाताना त्या ठिकाणी पाणी साचत असल्याने रस्ता निसरडा होऊन विद्यार्थी पडत आहेत संबंधितांनी योग्य दखल घेऊन पाण्याची गळती थांबविण्याची पालकांनी एकमुखी मागणी केली आहे.श्री रवींद्र तायडे
शाळेसमोर व्हॉल्वची गळती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 5:43 am