शहागंज भागात खूपच वर्दळ असते साधे वाहने चालवणे दुरापास्त असताना काही मुजोर ऑटो रिक्षा चालक रस्त्यावरच रिक्षा उभी करतात त्यामुळे पादचाऱ्यांना करण्यास त्रास सहन करावा लागतो किरकोळ विक्रेतेही रोडवरच ठाण मांडून बसलेली असतात त्यामुळे वाहने चालवावी कशी असा संतप्त सवाल वाहनधारक विचारीत आहे. महानगरपालिका अतिक्रमण पथक व वाहतूक पोलिस आले की तेवढ्यापुरते रस्ते मोकळे होतात व पथकाने पाठ फिरवताच पुन्हा जैसे थे परिस्थिती बघायला मिळते.श्री रवींद्र तायडे
बेशिस्त रिक्षा चालक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2019, 5:46 am