करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येणार, अशी चर्चा आहे, या लाटेला थोपवण्यासाठी नागरिकांनीसार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट आता पसरत चालली आहे, बर्याच राज्यांमध्ये आता रात्रीची संचारबंदी लागु करत आहेत. असे दिसून येते की सार्वजनिक ठिकाणी बरेचसे नागरिक विना मास्क बिनधास्त फिरत आहेत, तसेच सोशल डिस्टंसिग सुद्धा पाळत नाहीत.विनाकारण गर्दी करणे,मास्क न घालता वावरणे,असे प्रकार दिसुन येत आहे. अजूनही कोरोना पुर्णपणे गेलेला नाही. करोना वरची लस अजुनही बाजारात आलेली नाही. अशा वेळी आपणच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. बाहेर पडताना मास्क हा घातलाच पाहिजे. उगाचच कारणाशिवाय बाहेर पडुन गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.जर आपण सांगितलेल्या नियमांचे पालन करून मास्क वापरून बाहेर पडलो, तर कोरोनाच्या दुसर्याच्या लाटेपासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकतो. लस येईल तेव्हा येईल,तो पर्यंत मास्क वापरणे,सेनेटाइझर वापरणे,हात धुणे,सोशल डिस्टंसिग पाळणे हीच आमच्या साठी लस आहे ,जी आम्हाला या येणार्या लाटे पासुन वाचवेल.
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाटयेणार,अशी चर्चा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2020, 5:32 am