चीनचा निषेध करण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद करणे तर आवश्यक आहेच त्याशिवाय आपण सर्वांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करणे आवश्यक आहे.जसे की टाटा मीठ,टाटा कार/,बजाज , सूर्या बल्ब/अमूल दूध/फ्रिज व्हर्लपूल /लिज्जतपापड इ थोडक्यात म्हणजे भारतात तयार होणारी उत्पादनेच खरेदी करावीत .तसेच खेडोपाडी पिकविलेल्या बटाट्याःपासून जागेवरच चीप्स तयार करणे , टमाट्यांपासून सॉस तयार करणे.तसेच आटा,मैदा , रवा इ.खेड्यांमध्येच तयार करावे.शहरांकडे येणारा लोंढा थांबेल व तरूणांना रोजगारही मिळेल.थोडक्यात काय तर कुटीर उद्योगांना जागेवरच उत्पादन करु देऊन बाजारपेठही उपलब्ध करून द्यावी.सोलार पँनेलसाठी लागणाऱ्या ८५% भाग जे आपण चीनकडून घेतो त्याचे उत्पादनसुदूधा आपला युवावर्ग जिद्दीने करु शकतो.प्रशिक्षण देऊन ही युवाशक्ती आपण स्वावलंबी बनवून स्वदेशी उत्पादने वाढवून इतर देशांकडून आयात कमी करून आपला भारत पुन्हा शक्तिशाली बनवू......शरद लासूरकर औरंगाबाद .
चीनचा निषेध करण्यासाठी ........
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2020, 5:30 am