सार्वजनिक ठिकाणी अद्याप सुरक्षित वावरण्याच्या नियमांचे पालन,मास्कचा वापर होताना दिसत नाही. ही खरी गोष्ट आहे. बरेच नागरिक बाजारात विना मास्क फिरताना दिसतात, हे त्यांच्या आणि दुसर्याच्या तब्येतीच्या हानीकारक आहे.गर्दीच्या ठिकाणी कोण कोरोना पोझीटीव कोण कोरोना निगेटिव्ह हे सांगता येणे कठीण ,अशा वेळी विना मास्क फिरणे म्हणजे आजाराला निमंत्रण. पण नागरिकांना याचे गांभीर्य कळत नसल्यामुळे ते असे वागतात, अशा वेळी प्रशासनाने त्यांना मोठा दंड लावला, तर ते दंड द्यायला नको म्हणून मास्क लावुन बाहेर पडतील.कारण रोज रोज दंड भरणे कठीण होवून ते आठवणी ने मास्क लावतील. आणि हे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षितेच्या द्रुष्टीने सुद्धा चांगले असेल.कारण आता समजुन सांगण्याचची वेळा निघून गेली आहे. आता ठोस कारवाई करण्याची वेळ आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्कने वापर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2020, 5:32 am