स्वच्छ औरंगाबाद सुंदर औरंगाबाद अंतर्गत स्मार्ट सिटीच्या गुणांकन करण्यासाठी महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करून पुढाकार घेतला होता. शाळा महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेचे धडे देण्यात येत होते. परंतु शहरांमध्ये ठिकठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे चित्र बघायला मिळते. सिडकोतील एन -७ शास्त्रीनगर या भागात रस्त्यांवर असा कचरा विखुरलेला दिसतो. कचरा वेचणारे त्यातून काही मौल्यवान मिळते का याचा शोध घेत कचरा चिवडत असतात.नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने हा कचरा इतस्तत विखुरतो. पावसामुळे तो कुजतो हा कचरा वेळेवर उचलत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे .श्री रवींद्र तायडे
कचरा उचलणार केंव्हा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2019, 5:43 am