हर्सूल ते पिसादेवी रोडच्या दुतर्फा अनेक नागरी वसाहती नव्याने निर्माण झाल्या आहेत. हजारो लोकांचे या भागात कायमस्वरूपी वास्तव्य आहे. असे असतांना हर्सूल ते पिसादेवी या रोडचे विस्तारीकरण तर नाहीच नाही पण पावसामुळे रस्त्याचे तीन तेरा वाजलेले आहेत. जागोजागी खडी वर आलेली आहे,खड्ड्यात रस्ता, की रस्त्यात खड्डा हे समजायला मार्ग नाही.हा रोड पुढे सावंगी केम्ब्रिज बायपास ला मिळत असल्याने लपून छपून जड वाहतूकही या रोडवर सुरू असते त्यामुळे रोड खूपच खराब झालेला आहे.शहरातील या महत्वपूर्ण रोडचे रुंदीकरण करून तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी येथील रहिवाश्यांनी keli आहे,रवींद्र तायडे
पिसादेवी रोडचे डांबरीकरण केंव्हा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2017, 5:33 am