आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा विस्तार चहूबाजूने दिवसेंदिवस वाढतच आहे.शहरातील जड वाहतूक बीड बायपास मार्गे वळविण्यात आल्या नंतर शहरवासीयांना मोठा सुखद दिलासा मिळाला होता. परंतु आता बीड बायपासच्या दुतर्फाही मोठ्या नागरी वसाहती स्थापन झाल्याने बीड बायपास रोड शहराबाहेर असूनही तो आता बायपास वाटतच नाही. शहरांतर्गत वाटतो. त्यामुळे या रोडवर कित्येकांचे निष्पाप बळी गेलेले आहेत. सर्विस रोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढली गाजावाजा झाला.परंतु ठोस कारवाई अभावी सर्विस रोड चे काम रेंगाळतच चाललेले आहे. महानगरपालिका व संबंधित यंत्रणा या रोडवरील आणखी निष्पापांच्या बळींची वाट तर फार नसावी ना ?अशी शंका आल्यावाचून राहत नाही. श्री रवींद्र तायडे
मनपाला आणखी निष्पापांचे बळी हवे आहेत का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2019, 5:40 am