कोल्हापुर नगरी अनेक गोष्टी साठी सुप्रसिध्द आहे,त्यातील एक अनेक एैतिहासिक घटनाचा साक्षीदार म्हणजे जुना राजवाडा याच चौकात व वाड्यात अनेक रक्त रंजित घटना घडल्या,याच चौकात 1857 चे उठावाचे नेत्रृत्व छत्रपती चिमासाहेब महाराज हे ईग्रजांचे नकळत करत होते याचा सुगावा ईंग्रजांना लागताच त्यांनी त्यांच्या साथादारांना याच चौका मधे तोफेच्या तोंडी दिले,महाराजांना याच वाड्यात नजर कैदेत ठेवले,त्यांना सोडवण्यासाठी युध्द ही झाले कालांतराने त्यांना नकळत अटक करून कराची ( पाकिस्तान) येथे पाठवण्यात आले तेथेच त्याचा देहांन्त झाला.अश्या अनेक घटनांचा साक्षीदार आज अतिक्रमण व अनेक व्यधींनी ग्रस्त झाला आहे,चहा पानबीडी खावु ची टपर्या,जाहीरात या मुळे या चौकाचे, वाड्याचे रूपांतर बकाल अवस्थेत झाले आहे.या वाड्याची या सर्व अतिक्रमाणातुन सुटका होवो व वाड्याचे गतवैभव परत प्राप्त होवो,वाड्यास चौकास एैतिहासीक वास्तु घोषित करावे ही सदबुध्दी येवो ही अपेक्षा.धन्यवाद
एैतिहासिक वास्तुची जपवणुक व्हावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2017, 5:30 am