शहरात आयआरबी कंपनीने रस्त्यांची कामे केली. रस्त्यांबरोबर शहरात फुटपाथही झाले; पण काही ठिकाणी फुटपाथचे काम अर्धवट स्थितीत आहे. हुतात्मा समारकापासून खाली तोरणानगरपर्यंतचे फुटपाथचे काम रेंगाळलेले आहे. या संदर्भात संबंधित कंत्राटदारांना बऱ्याचदा सांगूनही त्यांनी याबाबत दखल घेतलेली नाही. त्यामुळे महापालिकेने यात लक्ष घालून काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.
- प्रकाश घाटगे, कोल्हापूर
- प्रकाश घाटगे, कोल्हापूर