मी गजानन महाराज नगर-सिंधूनगरी कॉलनीतील रहिवासी असुन गेले कित्येक वर्ष आमच्या इथे गटारीची सोय नसल्याने पाणी साचून घाणीचे सामाज्य पसरले आहे. आता ही ३ री बातमी प्रसारित होत आहे,आमच्या गल्लीतील फक्त दोन घरानमुळे हि परिस्थिती झाली आहे, धुणी-भांडी बाहेर करत असल्यामुळे पाणी सर्व खाली साचून डासांचे प्रमाण खूप वाढले आहे.महानगरपालीकेचा अधिकारी येऊन पाहणी करावी म्हणजे खरी परिस्थिती समजेल, चोवीस तास पाणी असल्याने महानगर पालिकेच्या कर्मचारणाना साफसफाई करताना आढतळा येतो, कर्मचारी फक्त लोटून जातात. एक तर लवकरात गटार करावी किंवा मोठी चाच मारण्यात यावी जेणे करून ते पाणी पुढे जाईल.तरी लवकरात लवकर महानगरपालिकेने गटारीची सोय करावी.
लवकरात लवकर गटार करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2017, 5:33 am