सध्या पोलिस विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असून, त्याबद्दल जनजागृती अभियान सुरू आहे. त्यासाठी जाहिरातबाजी व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. तथापि, ज्या यंत्रणेनी याची अंमलबजावणी करायची त्याच यंत्रणेचे हवालदार याच सप्ताहात खाकी वर्दी घालून झेब्रा क्रॉसिंगवर बिनधास्त वाहन घेऊन उभे आहेत. नियम शिस्त फक्त जनतेनेच अंगिकारायचे काय? हा प्रश्न सामान्य जनतेस पडला आहे.
- विश्वानाथ गावडे, कोल्हापूर
- विश्वानाथ गावडे, कोल्हापूर