हे बालमजूर गरीब घरांमध्ये जन्माला आले ही त्यांची चूक आहे का स्वतःच्या घरच्या गरीबी साठी स्वतःची व आपल्या आई-वडिलांचे पोट भरण्यासाठी एवढी छोटी छोटी बालके नको त्या पद्धतीने नाही तितक्या प्रमाणात एवढे काबाडकष्ट या लहान वयामध्ये घेतात मग आपल्या भारत देशातील नेतेमंडळींना मोठमोठे नावाजलेले पक्ष आहेत त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मोठ्या प्रमाणात या बालमजुरांसाठी ज्या शासनाच्या योजना येतात त्या प्रशासनाकडून याची दखल का घेतली जात नाही एक मोठा विचार करणारा यक्ष प्रश्न आहे हा जर काहीही प्रशासनाकडून नेतेमंडळींकडून अगर कुठल्या पक्षांकडून असेच बेदखल होत असेल तर या समाजातील जे विचार करणारे नागरिक आहेत त्यांनीच पुढाकार घेऊन या समाजातील ही परिस्थिती बदलणे फार महत्वाचे ठरणारे आहे या प्रशासनास नेतेमंडळींना एक ना एक दिवस धडा शिकवणे जरुरीचे आहे.श्री अभिजीत विलास पाटील
बालमजुरीवर शासनाच्या काही योजना आहेत की नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2018, 5:35 am