सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी वगळल्या तर सर्वत्र मतदान अगदी शांततेत पार पडले याबद्दल खरेतर यंत्रणांचे कौतुक तर करायलाच हवे. यावेळी मतदानासाठी थोडी वेगळी पद्धत वापरण्यात आल्याने संभ्रमाची परिस्थिती होती व काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदारांच्या मोठया रांगा केंद्रांबाहेर लागल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे. मात्र ती परिस्थिती हाताळण्यात निवडणूक कर्मचारी व पोलिसांना आलेले यश झाकता कामा नये. मतदान शांततेत पार पाडल्याबद्दल निवडणूक यंत्रणा व मतदारांचेही अभिनंदन. वैभव पाटील
निवडणूक यंत्रणा व मतदारांचे अभिनंदन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:11 pm