कांजूरमार्ग (पूर्व )येथील कदम चाळ,दादा कंपनी रोड या ठिकाणी रहदारीच्या रस्त्यावर टाकलेला कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे सदर परिसरात सदैव दूर्गधीयुक्त वातावरण असते.याच परिसरात जीवन विकास हायस्कूल असून विद्यार्थ्यांना आणि पादचारी वर्गाला नाक मुठीत धरुन जावे लागते.परिसरात रोगराईचा धोकाही संभवतो .तरी पालिकेने कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवावा. ---प्रदीप दत्तात्रय भांबुरे चेंबूर,मुंबई .
कचरा हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 5:43 am