प्रशासनातील अधिकारी आणि राज्य सरकार यांची अनास्थे पायी सरकारी योजना असो इतर कोणत्याही बाबतीत न्यायालयाला या संदर्भात हस्तश्रेप करावा लागतो हेच आजच्या सरकारी अधिकारी तसेच जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी समान जबाबदार आहेत.कारण सरकारी कार्यालयात सामान्य जनतेचे काम करताना अनेक अडचणी येतात त्यांस हे दोन्ही घटक जबाबदार आहेत.अनेक शासकीय योजना तळागाळात पोचत नाहीत. सामान्य जनतेला त्यांच्या शासकिय योजनांचा लाभ या सरकारी अधिकारी आणि राज्य सरकार मधील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत त्यामुळे या अंमलबजावणी करिता न्यायालयाला वारोवार यांची उघडनी करावी लागते या सारखी कोणती निंदनीय बाब नाही या वरती कठोर कारवाई होवून सामान्य जनतेला त्यांच्या शासकीय योजना तसेच विविध प्रश्नांसंदर्भात संबधित प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी जनतेला न्याय हक्क मिळवून दिले पाहिजेत. अँड गणेश शेळके , चेंबूर
प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची अनास्था ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2019, 5:46 am