मुंबईचा रस्ता म्हणजे फेरीवाले, हे समीकरण काही केल्या बदलत नाही. यांना हटवणारी यंत्रणाच संशयाच्या छायेत आहे. संबंधित यंत्रणेने मनात आणले तर या समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त होऊ शकतो याचे उदाहरण काही ठिकाणी दिसते. आता मात्र फेरीवाला हा गरजेपेक्षा फोफावत आहे. कदाचित प्रशासनाचे अती लाड यास कारणीभुत आहेत. आतातर यांची संघटकात्मक दादागिरी होऊ पहात आहे. वेळीच यासाठी कठोर धोरण अवलंबणे गरजेचे आहे. फोफावत चाललेली फेरीवाला ही संकल्पना शहराच्या सुशोभीकरणासाठी अडसर आहे. यासाठी वेळीच उपाय योजावेत.
फेरीवाला, गरजेपेक्षा दुखणे जास्त...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2020, 5:45 am