आजही मुंबईत फायर अॉडिटकडे दुर्लक्ष केले जाते.परंतु हल्ली बर्याचशा सहकारी वसाहतींमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत .बर्याचशा इमारतीतर इतक्या जवळजवळ व दाटिवाटित वसलेल्या आहेत की आगीचे बंब आग विझवायला इमारतीच्या आतल्या भागात पोहोचूही शकत नाहीत अशा वेळी आपल्या इमारतीत बसविलेली अग्निशन यंत्रणा काही अंशीतरी उपयोगी पडते.म्हणून सर्वांनीच आपली ही सामाजिक जबाबदारी म्हणून याला प्राधान्य द्यावे व त्याचबरोबर पालिकेनेपण जनतेमध्ये या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करणे योग्य ठरेल प्रकाश वा.दातार अंधेरी पूर्व .
अग्निशमन यंत्रणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2019, 4:26 pm