मध्य रेल्वेच्या मशीद बंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २ व ३ वरील पादचारी पूल खूप अरुंद आहेत. गर्दीच्या वेळेत सामान्य प्रवासी व विशेषतः मालवाहतूक करणाऱ्या हमालांना याचा प्रचंड त्रास होतो. अनेकदा हे पुल प्रचंड गर्दीने खचाखच भरलेले असतात, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने या पुलांची रुंदी वाढवावी. - राजेश मेस्त्री
पुलाची रुंदी वाढवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2019, 5:42 am