सरकारने मराठी भाषा सर्वच बोर्डासाठी सक्तीची करावी. शहरांत तसेच खेडोपाडी शुद्ध मराठीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सद्य परिस्थितीत मराठी माणूसच आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा अट्टाहास करतात. तसेच घरातही मुलांशी मराठी बोलण्याची पालकांनाच लाज वाटते. मराठी भाषेचे संवर्धन व जतन होण्यासाठी मराठी माणसांनीच सरकारवर दबाव आणवयास हवा. मराठी आपली मायबोली कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहिली पाहिजे.
मराठी माणसांनीच सरकारवर दबाव आणावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 5:41 am