जनतेला विविध कामांची,सुविधांची माहिती मिळावी तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण जलदरीत्या करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने समाज माध्यमावरील सर्व माध्यमे एकत्रित आणून ती एकाच व्यासपीठावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पालिका विभाग गतिमान होऊन ते जनतेला उपयुक्त ठरणार आहे.पण त्या विभागाच्या देखभालीसाठी होणारा खर्च ठाणे महापालिकेपेक्षा खूपच मोठा असल्याने जनतेत शंका व्यक्त होत आहे.पालिकेने या बाबत स्पष्टीकरण द्यावे म्हणजे जनतेची शंका दूर होऊन समाधान होईल- नंदकुमार पांचाळ
पालिकेने खर्चाबाबत जनतेचे समाधान करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2019, 5:44 am