कांजूरमार्ग पश्चिमला असलेल्या एमएमआरडीए वसाहतीच्या प्रवेश द्वारा जवळची ही दशा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आहे. बेस्ट आणि महानगर गॅस एजन्सीने आपल्या कामासाठी रस्ता खणला पण त्यावर नीट पेवर ब्लॉक लावले नाहीत. बाजूलाच बीएमसी ची कचरापेटी आहे त्याचे घाणेरडे पाणी तसेच रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी येथे पावसाळ्यात साचते आणि रहिवाश्यांना त्याच पाण्यातून वाट काढावी लागते. सदर ठिकाणाहून लेप्टोस्पा यरोसिस (leptospirosis) सारखा आजार पसरू शकतो. तरी बीएमसीने आपल्या हद्दीतील या ठिकाणची पावसाचा जोर वाढण्या आधी दुरुस्ती करावी आणि पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था ताबडतोब करावी. सदर दुरुस्ती ही काँक्रिट ची असावी कारण तात्पुरते डेब्रिज चा भराव टाकून ठेवल्यास त्या ठिकाणी पुन्हा चिखल होईल.
पावसाच्या पाण्यामुळे रोगप्रसार होण्याची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 5:45 am