ज्येष्ठ नागरिकांवर होणारे जीवघेणे हल्ले व ते रोखण्यात संबंधित यंत्रणांना येत असलेले अपयश ही निश्चितच चिंतेची बाब असून यात स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे जरूरीचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही अनोळखी व्यक्तींना, मग ते कुठल्याही कारणासाठी आलेले असोत, घरात घेणे टाळावे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून रहाण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुबियांनीही आपल्या घराला सेफ्टी डोअर लावणे, सेफ्टी अलार्म लावणे, घरातील ज्येष्ठ सदस्यांची फोटो सकट माहिती संस्थेच्या कार्यकारिणीला देणे आवश्यक आहे. दिलीप पेडणेकर (अंधेरी)
'फारंच गंभीर बाब'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2019, 5:43 am