प्रताप नगरातील एटीएम केंद्रात अस्वच्छता पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या एटीएमचा परिसर स्वच्छ करण्यात आलेला नाही. एटीएम केंद्रात कचरापेटी नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांना एटीएममधुन निघणाऱ्या पावत्या फेकण्याची सोय नाही. एका खासगी बँकेचे हे एटीएम आहे. त्या बँकेचे देखील स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांना खाली पडलेल्या कचऱ्यातून वाट काढत जावे लागते. या एटीएम केंद्राची सफाई करून येथे कचरापेटी बसविणे नितांत गरजेचे आहे.- सूरज लंगडे
एटीएम केंद्रात अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2018, 5:36 am