रेल्वे स्थानकाच्या परिसरात थांबणाऱ्या मालगाड्यांपैकी काही कोळसा वाहून नेतात. या गाड्यांच्या वाघिणींमधील कोळसा काही समाजकंटक पेटवून देतात. त्यामुळे प्रदूषणात तर वाढ होतेच, शिवाय धगधगत्या कोळश्यामुळे मोठा अपघात घडण्याचाही धोका असतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. अन्यथा एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.- सचिन जगताप
जळत्या कोळश्यामुळे धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jan 2018, 5:33 am