रिंगरोडवरील श्रीनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेत. हे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामावरील गिट्टी आदी साहित्यही येथेच पडून आहे. त्यामुळे या गिट्टीवरून वाहने घसरत आहेत. रस्त्यावर पसरलेल्या बारीक गिट्टीवरून एखादे वाहन घसरून जीवघेणा अपघात घडल्यास त्यासाठी कुणाला जबाबदार धरावे, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.- सचिन रोडे
रस्त्याच्याकडेला बांधकाम साहित्य पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2020, 5:47 am