विजेचे केबल टाकण्यासाठी खणण्यात आलेले खड्डे व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत. रस्त्याच्या कडेला हे खड्डे अर्धवट बुजविलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे व्यवस्थित बुजविण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतु त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन किती सुस्त आहे, याची प्रचिती येते.- शंतनू समर्थ
केबलचे खड्डे अर्धवट बुजविले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2020, 5:45 am