दत्तवाडी भागातील भारत पेट्रोल पम्पाजवळ अस्वच्छ पाण्याचे डबके साचले आहे. या पाण्याला आता दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाडी नगरपालिकेकडून या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अस्वच्छ पाण्याचे हे डबके येथुन न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.- अरुण कराळे
दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2020, 5:45 am