दिघोरी नाक्याजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना अनेक वाहने घसरत आहेत. परिणामी येथे अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे अनेक जण जखमीही झाले आहेत. हे मातीचे ढिगारे येथुन उचलण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.- परेश निंबर्ते
मातीच्या ढिगाऱ्यांनी अपघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2018, 5:33 am