रघुजीनगरातील सोमवारपेठ येथे असलेला विजेचा खांब धोकादायक ठरत आहे. खालच्या बाजूने हा खांब पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे तो केव्हाही कोसळू शकतो. हा खांब काढून टाकण्यात यावा, यासंदर्भात नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. परंतु संबंधित यंत्रणेला या बाबीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.- प्रवीण मेंढी
विजेचा खांब ठरतोय धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2018, 5:38 am