रस्त्यावरील अंधार दूर करण्यासाठी मानेवाडा परिसरात पथदिव्यांचे खांब उभारण्यात आले आहेत. परंतु या खांबांची उभारणी करताना टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या थरावर पाण्याचा माराच करण्यात आलेला नाही. त्यामुळे सिमेंटचा थर धोकादायक ठरू शकतो. सिमेंटच्या मुलाम्याला पुरेसे पाणी न मिळाल्याने ते तडकू शकतात. त्यामुळे पथदिव्यांचे खांब केव्हाही कोसळू शकतात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.- मुकुंद सांबारे
पथदिव्यांचे खांब धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2020, 5:44 am